नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रोवन मागच्या आठ दिवसांमध्ये मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील अनेक भागात पावसाने मोठं नुकसान केलंय या नुकसानीचे पंचनामे आता अंतिम टप्प्यात आलेत पण आता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किती मिळणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय कारण सरकारने मध्यंतरी नुकसान भरपाई देताना हेक्टरी मर्यादा दोन हेक्टर पासून तीन हेक्टर पर्यंत वाढवली होती तसेच कोरडाऊ बागायती आणि फळ पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी भरपाई देखील वाढवली होती त्यामुळे सरकार नव्या निकषानुसार भरपाई देत देणार की जुन्या निकषानुसारच भरपाई देणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय म्हणजेच वाढवलेल्या निकषानुसार देणार की फक्त एनडीआरएफ च्या निकषानुसार भरपाई देणार हा प्रश्न अनेकांना पडलाय
पण जोपर्यंत सरकार नव्या निकषानुसार भरपाई जाहीर करत नाही तोपर्यंत जुन्या निकषानुसार म्हणजेच कमी नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे मात्र शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर आणि निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सरकार वाढीव दराने भरपाई देऊ शकतं अशी माहिती कृषी विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी देखील दिली आहे आता सरकारने नोव्हेंबर 2023 आणि आणि त्यापुढच्या काळात झालेल्या पीक नुकसानीसाठी वाढीव मदत देण्याबाबतचा जीआर म्हणजेच शासन आदेश 1 जानेवारी 2024 रोजी काढला होता या जीआर मध्ये सरकारने म्हटलं होतं की नोव्हेंबर 2023 आणि त्यापुढच्या काळात अवकाळी पाऊस गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव भरपाई देण्यात येईल असं म्हटलं होतं म्हणजेच एनडीआरएफ च्या मदतीपेक्षा
जास्त भरपाई राज्य सरकारने जाहीर केली होती मग ही वाढीव भरपाई किती होती तर कोरडा पिकांसाठी हेक्टरी भरपाई 8500 रुपयांवरून ₹13600 करण्यात आली होती बागायती पिकांसाठी ₹17000 ऐवजी ₹27000 आणि फळ पिकांसाठी ₹22500 ऐवजी ₹36000 भरपाई जाहीर केली होती आता सरकारने भरपाईसाठी क्षेत्र मर्यादा देखील त्यावेळी वाढवली होती जुन्या निकषानुसार म्हणजेच एनडीआरएफ च्या निकषानुसार हेक्टरी मर्यादा ही दोन हेक्टर पर्यंत होती म्हणजे शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंतच नुकसान भरपाई मिळत होती पण सरकारनं भरपाईची मर्यादा दोन हेक्टर वरून तीन हेक्टर केली म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त तीन हेक्टर पर्यंत भरपाई मिळेल असं सरकारनं त्यावेळेस स्पष्ट केलं होतं पण अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं
की त्यांना तीन हेक्टर नाही तर दोन हेक्टरच्या मर्यादेतच भरपाई मिळाली होती तसंच सरकारने जीआर मध्ये म्हटलं होतं की नोव्हेंबर 2023 आणि त्या पुढच्या काळात झालेल्या पीक नुकसानीसाठी ही वाढीव भरपाई दिली जाईल तसेच हा जीआर 1 जानेवारी रोजी काढला होता म्हणजेच एक जानेवारी पर्यंत झालेल्या नुकसानीसाठीच हा जीआर लागू होता त्यापुढच्या नुकसान भरपाईसाठी हा जीआर लागू पडणार नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय म्हणजेच जर सरकारने नवा जीआर काढून वाढीव दराने भरपाई देण्याचा निर्णय घेतला नाही तर शेतकऱ्यांना फक्त एनडीआरएफच्या निकषानुसारच भरपाई मिळेल मग एनडीआरएफ ची भरपाई किती आहे तर एनडीआरएफ च्या निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेमध्येच भरपाई मिळते हेक्टरी भरपाईचा विचार
जर केला तर कोरड पिकांसाठी हेक्टरी ₹8500 रुपये भरपाई मिळते बागायती पिकांसाठी ₹17000 आणि फळ पिकांसाठी 22500 रुपये हेक्टरी भरपाई मिळते मग मागच्या नुकसानीच्या वेळी राज्य सरकारने वाढीव भरपाई जाहीर केली होती आताही सरकारने वाढीव भरपाई जाहीर केल्यास शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये भरपाई मिळू शकते कोरडा पिकांना हेक्टरी 13600 तर बागायती पिकांसाठी 27 हजार रुपये आणि फळ पिकांसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टरी भरपाई मिळू शकते पण त्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा लागेल तसा जीआर काढावा लागेल आता निवडणुका लक्षात घेता सरकार असा निर्णय घेऊ शकतं याची दाट शक्यता आहे त्यासाठी आपल्या शेतकऱ्यांना ही मागणी रटावी लागेल आता तुम्हाला काय वाटतं
सरकार नव्या निकषानुसार भरपाई देईल की केवळ एनडीआरएफ ची भरपाई आपल्या शेतकऱ्यांना देईल आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तसेच रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंट मधून शेतीमालाचा बाजारभाव इतर योजनांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या ऍग्रोच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका [संगीत]